Ranji Trophy 2019 : पृथ्वीचा शो-टाईम; झळकाविले आक्रमक द्विशतक
भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने रणजी करंडकात पुनरागमन करताच शानदार शतक झळकाविले. मात्र, त्यावर समाधानी राहिल तो पृथ्वी कसला. मुंबईच्या प्रत्येक खेळाडूप्रमाणे त्याने चिवट फलंदाजी करत द्विशतक झळकाविले.
मुंबई : भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने रणजी करंडकात पुनरागमन करताच शानदार शतक झळकाविले. मात्र, त्यावर समाधानी राहिल तो पृथ्वी कसला. मुंबईच्या प्रत्येक खेळाडूप्रमाणे त्याने चिवट फलंदाजी करत द्विशतक झळकाविले.
त्याने पहिल्या डावातही आक्रमक फलंदाजी करत 66 धावा केल्या होत्या मात्र, त्याचे शतक हुकले होते. बडोद्याविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात त्याने 84 चेंडूंमध्ये शानदार शतक झळकाविले. उपहारापर्यंत तो 122 धावांवर होता. उपहारानंतर त्याने आपले द्विशतक पूर्ण केले. त्याने 179 चेंडूंमध्ये 2020 धावा केल्या. यात त्याने 19 चौकार आणि सात षटकार खेचले.
मुंबईची धावसंख्या सध्या 300 पार गेली आहे आणि त्यांची सामन्यावर भक्कम पकड आहे. मुंबईने मोसमाची जोरदार सुरवात केली असताना पृथ्वी शॉनेही दोन्ही डावात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच फेब्रुवारीमध्ये भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामध्ये कसोटी मालिकेमध्ये पृथ्वीला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.